अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व ग्रामीण तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व धुळे तालुका यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून ॲड संभाजी पगारे ‘ ताईसो . सौ तारकाबाई विवरेकर ‘ डॉ . सुशील महाजन अण्णासो .हिलाल माळी ‘ आप्पासो हनुमंत वाडीले अण्णासो गंगाधर माळी , बापूसाहेब खलाणे ‘ सौ . भारतीताई माळी ( नगरसेविका ) प्राचार्य बी एच जाधव ‘अण्णा माळी सर दादासो . वासुदेव देवरे ( विभागीय अध्यक्ष )’ श्री दादासो आर के माळी (जिल्हाध्यक्ष सोनगीर ) श्री काशिनाथ माळी सर संतोष महाजन ‘सुनील महाजन (शिरपूर )प्रवीण महाजन (दोंडाईचा ) रविद्र बिराडे श्री भिला पाटील शिंदखेडा गणेश खलाने ‘ सुरेश कौतिक माळी सुमित कैलास वाघ आत्माराम माळीसर सुदाम माळी ,चेतन माळी ,भिका माळी गुरुजी ‘रविंद्र सुका माळी ,भानुदास माळी (बोरकुंड ) विजय जाधव (नगरसेवक ) ‘श्री कैलास हजारे ( नगरसेवक )’श्री मिलिंदभाऊ सोनवणे ( मा . नगरसेवक ) ‘श्री प्रशांत महाले ( वर्षी ) ‘प्रा भगवान जगदाळे ( कार्याध्यक्ष धुळे जिल्हा ) संजयबाबा खैरनार ( नाशिक विभागीय उपाध्यक्ष ) शंकरराव खलाणे ( नेर ) ,श्री हरीशचंद्र रेंडे ( शहराध्यक्ष ) राजेंद्र गवळे ‘ ,ज्ञानेश्वर माळी ( महानगर सचिव ) आदि होते . यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संत सावता माळी ,महात्मा ज्योतिबा फुले ‘ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिप्रज्वलन करण्यात आले .यानंतर प्रास्ताविक दादासों . आर के माळी यांनी केले .यावेळी ते म्हणाले की समाजाच्या मुलांच्या प्रगतीत नक्कीच हा सत्कार आणि ह्या प्रेरणा कामी येतील म्हणूनच अशा कार्यक्रमाचे आवश्यकता आहे . असे त्यांनी सांगितले . त्यानंतर अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकारी कडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . आणि इयत्ता दहावी ‘इयत्ता बारावी ‘बीए ‘बीकॉम बीएससी ‘ डी फार्मसी ‘डिप्लोमा इंजीनियरिंग ‘कृषी पदविका ‘ तसेच विशेष सत्कारामध्ये एमपीएससी यूपीएससी आणि समाजातील काही व्यक्तींच्या विशेष पदी निवड झालेले होती म्हणून त्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह आणि बुके देऊन जाहीर सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमात जवळजवळ दोनशे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी डॉक्टर सुशील महाजन यांनी मनोगतातून म्हणाले की समाज ही दुसरी आई असते . ज्याप्रमाणे आई कडे आपण मागणी करतो तसे समाजाकडून सुद्धा आपण चांगले मागणी करायला हवे . ‘ जो समाजाच्या पाठीशी असतो तो यशस्वी होतो .अशा कार्यक्रमातून हे सिद्ध होते .तसेच अण्णासाहेब हिलाल माळी यांनी मनोगतातून समाजाच्या मुलांची प्रगती आणि विशेष सत्कार करून त्यांच्यावर आपण समाज पुढे नेण्याच्यी जबाबदारी टाकू शकतो .अशा कार्यक्रमांची आज आवश्यकता आहे असे जाहीर करण्यात आले . तसेच यावेळी तलाठी ‘पोलीस पीएसआय ‘अशा अन्य पदांवर सुद्धा नेमणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला .याप्रसंगी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन श्री रवींद्र बोरसे ( चौगांवकर ) यांचा विशेष सत्कार करण्यात आला .याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड श्री संभाजीराव पगारे म्हणाले की विद्यार्थी आणि माळी समाजाची सर्वदूर चौफेर आणि सर्व क्षेत्रांमध्ये नाव कमावत आहेत म्हणूनच आम्हाला सार्थ अभिमान वाटतो . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलासराव पाटील यांनी असे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घेण्यात येतील आजच्या कार्यक्रमात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याचा मला सहर्ष व मनस्वी आनंद आहे . असे त्यांनी सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काशिनाथ माळी सर मनोज अहिरे संदीप माळीसर व आभार प्रदर्शन श्री काशिनाथ माळी सर यांनी केले . याप्रसंगी धुळे शहराचे अखिल भारतीय माळी महासंघाचे आणि धुळे ग्रामीणचे अखिल भारतीय माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि जयेश माळी ( युवाध्यक्ष )’ किशोर माळी , ह भ प न्हानू माळी गुरुजी ,श्री काशिनाथ माळी , मुरलीधर बाविस्कर ‘ राजेंद्र माळी , श्री हरिश्चंद्र रेंडे (शहराध्यक्ष ) राजेंद्र माळी , संदीप माळी मनोज खलाणे (नेर ) कैलास बोरसे ,श्याम निंबा माळी ,सुरेश जाधव ‘ संजय माळी ‘ प्रमोद सोनवणे ( चौगांव ) दशरथ माळी (लामकानी ) मनोज भाईदास माळी ‘महेंद्र जगतापसर श्री एस यू माळीसर ‘ विवेक गवळे ,सुनिल माळी कैलास रोकडे ‘असे अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला .